Sunday, November 6, 2022

वाक्यांचे भाग (उद्देश / विधेय)

वाक्यांचे भाग (उद्देश / विधेय)

> लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या : शब्दांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे 'वाक्य' होय.

वाक्याचे दोन भाग पडतात. 1) उद्देश 2) विधेय

उद्देश : वाक्यात ज्याच्याविषयी सांगितले जाते ते उद्देश असते.

विधेय उद्देश्याबद्दल जी माहिती सांगितली जाते ते 'विधेय' असते. ● वाक्यातील उद्देश व विधेय कसे ओळखाल ?

1. प्रथम वाक्यातील क्रियापद शोधा.

2. क्रियापदातील धातूला णारा/णारी/णारे प्रत्यय जोडा.

3. प्रत्यय जोडून कोण काय प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते तो उद्देश भाग होय.

4. 'उरलेला भाग 'विधेय' असतो.

उदा. गणेश सुंदर चित्र काढतो.

काढणारा कोण ? गणेश

उद्देश = गणेश विधेय = सुंदर चित्र काढतो.

5. उद्देश व उद्देशांविषयी माहिती देणारा शब्द हा उद्देश सदरात येतो व उरलेले सर्व शब्द 'विधेय' येतात.

उदा. माझे वडील हुशार आहेत.

क्रियापद = आहेत

असणारे कोण = वडील (उद्देश)

नमुना प्रश्न

प्र. 1 खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

"आमचा कुत्रा नॅन्डी बागेत खेळताना पडला.'

 2 खालील वाक्यातील विधेय ओळखा.

 भारताची राजधानी"दिल्ली ही भारताची राजधानी आहे.

प्र. 3 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा भाग ओळखा.

'देवांगीने सुरेल गीत गायले. 

प्र. 4 इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. '


भीमसिंह महाराज पु्यतिथीनिमित्त- जीवनक्रम महिती

 


भीमसिंह महाराज (जन्म - इ.स. १९२३ नेकनूर, बीड मृत्यू - ९ नोव्हेंबरइ.स. २००३) हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व कीर्तनकार होते. भगवानबाबांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील भगवानबाबांच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून १९ जानेवारी, इ.स. १९६५ पासून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराच्या शिखराचे काम केले.

भीमसिंह महाराजांच्या वडिलांचे नाव निहालसिंह तर आईचे नाव तुळजाबाई होते. त्यांनी आळंदीस वारकरी शिक्षणसंस्थेत गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला.

दिनांक १९ जानेवारी, इ.स. १९६५ यादिवशी भगवानबाबा यांचे निधन झाले. उत्त्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंह महाराज यांना गादीवर बसण्याची विनंती केली गेली परंतु भीमसिंह महाराजांनी 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनी सोनोपंत दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर भीमसिंह महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली.

संतश्रेष्ठ भीमसिंह महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची क्रांती केली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले. चालू असलेल्या अनिष्ठ रुढी, परंपरा, अंधश्रद्धा बंद केल्या. 

समाजप्रबोधन करून गुरुवर्य (वै.) भीमसिह महाराज यांच्या सहकार्याने मच्छिंद्रगड शिरूर कासार येथील पशुहत्या पूर्णपणे बंद करण्यात आली. भिमसिंह महाराजानंतर डॉं.नामदेव महाराज शास्री सानप हे महंत झाले.



जिल्हाअंतर्गत बदली समानीकरण धोरण

 जिल्हाअंतर्गत बदली समानीकरण धोरण खालील पत्रा प्रमाणे राबवले जाणार आहे. त्यामुळे आपली शाळा व शाळेत किती शिक्षक राहणार ते पाहू शकता.


संत गुरू नानक



                            संत गुरू नानक 

 गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

    गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.

सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.

सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.

गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी 'कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत', असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.

त्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.

        संकलन - भाऊसाहेब दहिफळे , 9881612712


पक्ष्यांच्या जगात - खंड्या पक्षी

 


पक्ष्यांच्या जगात - चिमणी

 


पक्ष्यांच्या जगात - कावळा


 

Friday, November 4, 2022

कोन व कोनाचे प्रकार चाचणी

                                                  कोन व कोनाचे प्रकार चाचणी सोडवण्यासाठी खालील लिंकला टच करून चाचणी सोडवा. 

 👉    कोन व कोनाचे प्रकार चाचणी सोडवा.